जीवन समृद्ध होण्यासाठी मनावर आणि बुद्धीवर संस्कार होणे आवश्यक असते. आर्य वैदिक धर्मात त्यासाठी १६ संस्कार कोणते, त्यांचे स्वरूप काय, त्याचा हेतू काय याची माहिती वेदमूर्ती श्रीकांत चितळे गुरुजी यांनी या पुस्तकात दिली आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे हे संस्कार आहेत. ते विधीपूर्वक केले जातात. श्रवण सुरू झाला की व्रतवैकल्ये सुरू होतात.
खरे तर व्रते वर्षभर सुरू असतात. अशा चैत्र ते फाल्गुन केल्या जाणाऱ्या व्रतांची तपशीलवार माहिती ज्योतिष ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे गुरुजी यांनी ‘व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी?’ या पुस्तकात दिली आहे. प्रायश्चित व्रते, दानव्रते, तिथीनुसार वारानुसार व्रते, राशीवर व्रते असा व्रतांची साद्यंत माहिती पुस्तकात मिळते. चातुर्मास, अधिकमास व्रतांसह अन्य खास व्रतांची माहितीही दिली आहे.
प्रकाशक : साठे प्रकाशन
पाने : ---
किंमत : १५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)